loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबाघाट बंद असल्यामुळे साखरपा-रत्नागिरी मार्गावर दिवसभरासाठी एस. टी. च्या फेर्‍या चालू ठेवण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्याकडे कोंडगाव वासियांची मागणी

देवळे (प्रकाश चाळके) - अतिवृष्टीमुळे आंबा घाटातील दरड कोसळून रस्याचीही दुरावस्था झाल्याने गेल्या काही दिवसांपासून आंबा घाट अवजड वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. परंतु पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे सदरचा घाट पूर्वीपेक्षा वाहतुकीस धोकादायक ठरत असल्याने जिल्हा प्रशासनाने एस.टी. वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला व जिल्हा एस. टी. प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर दिवसभरामध्ये किमान २५ ते ३० एस.टी.च्या फेर्‍या सुरू होत्या. परंतु अचानक सदर वाहतूक बंद झाल्याने रत्नागिरीकडे जाणार्‍या तसेच कोल्हापूरकडे जाणार्‍या प्रवासी वर्ग, नोकरदार वर्ग, विद्यार्थी वैद्यकीय उपचार, रेल्वे स्टेशन व अन्य प्रशासकीय कामांसाठी रत्नागिरी येथे जाणार्‍या सर्वांची प्रचंड अडचण होत आहे. सदरची बाब कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत उर्फ बापू शिंदे यांनी राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण भैय्या सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली व दिवसभर एस. टी. फेर्‍या सुरू करण्याची मागणी केली आहे.

टाईम्स स्पेशल

आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी त्वरित एस.टी.महामंडळाचे वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून यावर त्वरित निर्णय करून घेतो, असे सांगितले आहे. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांचा शब्द आणि सामान्य जनतेपोटी असलेली तळमळ पाहता नक्कीच साखरपा रत्नागिरी मार्गावर दिवसभर शटल सेवा सुरू होईल याची आम्हा साखरपा कोंडगाव वासियांना पूर्ण खात्री आहे, असा विश्वास प्रशांत बापू शिंदे यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg