loader
Breaking News
Breaking News
Foto

महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबाबत विलंब नको, तामिलनाडू विधानसभेत परिसीमन विरोधात प्रस्ताव पारित

चेन्नई - तामिलनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी आज बुधवार रोजी विधानसभेमध्ये परिसीमन विरोधात एक प्रस्ताव सादर केला. त्यांनी असे म्हटले की, २०२९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विद्यमान ५४३ जागांच्या आधारावर महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यामागे विलंब करता कामा नये. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबाबत उशिर करु नये. तामिळनाडू राज्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांनी अधिक मतदान केले आहे. महिलांना आरक्षण देणे, हे सामाजिक न्याय प्रकरण आहे. हा प्रस्ताव ठेवण्यामागचा उद्देश असा आहे की, जनसंख्या नियंत्रणामध्ये तामिलनाडू राज्य अग्रक्रमाने पुढे आहे आणि परिसीमनमुळे संसदेत महिलांची संख्या कमी होवू शकते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तामिलनाडूसह सर्व राज्य आणि केंद्रशाशित प्रदेशांमध्ये निर्वाचित लोकप्रतिनिधी निवडण्याबाबत जनगणना ५० वर्षांपेक्षा अधिक काळ झालेली नाही. आता २०२६ मध्ये जनगणना सुरु आहे, मात्र २०११ च्या जनगणनेच्या आधारावर मतदार संघाचे परिसीमन केले पाहिजे. असे ते म्हणाले. त्यांनी संवैधानिक संशोधन विधेयक २०११ च्या जनगणना आधारावर लोकसभेच्या जागा ५५० वरुन ८५० पर्यंत जातील. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात ठेवणार्‍या राज्यांना याचा फटका बसेल. विधानसभेत परिसीमन विरोधात बहुमताने प्रस्ताव पारीत करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg