loader
Breaking News
Breaking News
Foto

तिरंगा रॅलीने रत्नागिरी दुमदुमली: मारुती मंदिर ते जयस्तंभ दरम्यान नागरिकांचा अभूतपूर्व उत्साह!

रत्नागिरी : (जमीर खलफे) - रत्नागिरी शहरात आज देशभक्तीचे एक अलोट वादळ पाहायला मिळाले. निमित्त होते शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीचे! अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात या रॅलीला सुरुवात झाली असून, संपूर्ण शहर ’भारत माता की जय’ आणि ’वंदे मातरम’च्या जयघोषाने दुमदुमून गेले आहे. ही भव्य तिरंगा रॅली शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या मारुती मंदिर येथून अत्यंत दिमाखात निघाली आणि जयस्तंभ चौक येथे तिचा समारोप झाला. हातामध्ये फडफडणारा राष्ट्रध्वज, चेहर्‍यावर देशाभिमानाचे तेज आणि ओठांवर देशभक्तीपर गीते अशा अत्यंत चैतन्यमय वातावरणात ही रॅली पुढे सरकत होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या रॅलीचे मुख्य वैशिष्ट्‌य म्हणजे याला मिळालेला रत्नगिरीकरांचा अलोट प्रतिसाद! या रॅलीमध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वसामान्य नागरिक अतिशय हिरिरीने आणि मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुण वर्गाचा सहभाग यामध्ये लक्षणीय दिसून आला. हातात मोठा तिरंगा घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहाच्या भरात पुढे जाणारा हा युवा वर्गाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रॅलीच्या या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी उपस्थित राहून रॅलीचे स्वागत केले. रॅलीमुळे मारुती मंदिर ते जयस्तंभ या संपूर्ण परिसरात देशभक्तीचे एक वेगळेच वातावरण तयार झाले. रत्नागिरी शहराचा कोपरा अन् कोपरा राष्ट्रप्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg