loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशी ग्रामस्थ करणार १५ ऑगस्ट रोजी उपोषण

संगलट (खेड), (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील केळशी गावाकरिता मंजूर असलेली जलजीवन मिशन पाणी योजना आज अनेक महिने अर्धवट अवस्थेत निधी अभावी पडून आहेत. या योजनेकरिता निधी उपलब्ध करून मिळावा व योजना लवकरात लवकर पूर्ण करून मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केळशी येथील ग्रामस्थ १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण करणार असल्याची माहिती केळशीचे माजी उपसरपंच केदार पतंगे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केंद्र सरकार व राज्य सरकार यांची संयुक्त महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन हर घर, जलही योजना केळशी गावाकरिता मंजूर असून पन्नास टक्के काम पूर्ण होऊन जवळपास दीड वर्ष ही योजना अर्धवट अवस्थेत पडून आहे. याबाबत शासनाकडे व स्थानिक पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार चौकशी केली असता निधी उपलब्ध नाही असे सांगण्यात येते. ही नळपाणी योजना अपूर्ण असल्याने यावर्षी स्थानिक नागरिकांना एप्रिल ते जून या तिन महिन्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. व अखेर टँकरने पाणी विकत घ्यावे लागले आहे. तरी केळशी गावाकरिता असणारी ही महत्वाकांशी नळपाणी पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण करून केंद्र सरकारचे हर घर जल हे उद्दिष्ट पूर्ण व्हावे व नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा याकरिता अखेर नाईलाजास्तव १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दापोली तहसीलदार कार्यालयासमोर केळशी गावचे ग्रामस्थ एकदिवशीय उपोषण करणार आहेत. तशा स्वरूपाचे लेखी पत्रही संबंधित विभागाकडे सुपूर्त करण्यात आल्याचेही केदार पतंगे यांनी स्पष्ट केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg