loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

खेड - खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथे शनिवार दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सुभेदार सुनिल कदम व हवालदार दिनेश शिरकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मेजर सुनिल कदम यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा व देशप्रेम याबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले. 'हर घर तिरंगा' या उपक्रमाअंतर्गत दि. ७ ते १४ ऑगस्ट २०२६ या दरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देशाच्या स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 'हर घर तिरंगा' हा उपक्रम संपूर्ण देशभरात आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या उपक्रमाअंतर्गत दि. ७ ते १४ ऑगस्ट २०२६ या दरम्यान प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये इ. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी होऊन प्रत्यक्ष कृतीद्वारे देशप्रेम, थोर स्वातंत्र्यसैनिक व देशसेवेत कार्यरत असलेले जवान यांबद्दल आदर दाखवून दिला. यामध्ये राखी बनवणे व रांगोळी काढणे, जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांना पत्रलेखन व प्रश्नमंजुषा, पदयात्रा, तिरंगा सेल्फी घेण्यात आली. सदर पदयात्रेमध्ये १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरी सलग तीन दिवस तिरंगा फडकवण्याचे आवाहन करून जनजागृती करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, संस्था सदस्या स्वाती कान्हेकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस.अली, सीईओ विजय रॉबर्ट, गणेश जाधव, स्वरदा जाधव, ज्योती कदम, शिक्षक व शिक्षके तर कर्मचारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन फातिमा पालेकर, लावण्या म्हामूणकर, हिमांशू बना यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg