loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्ले ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झालेल्या वैभव बाईत यांचा नितेश देवकर मित्र मंडळाने केला सत्कार

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या आणि एक उत्तम व्यवसायिक असलेले आंजर्ले ताडाचा कोंड येथील रहिवासी वैभव बाईत यांची आंजर्ले ग्राम पंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी सर्वानुमते झालेली निवड ही गावातील वाद- विवाद आणि तंटे ग्रामस्थांच्या सहभागाने न्यायपूर्वक आणि शांततेने सोडवतील याचा विश्वास असलेल्या आंजर्ले येथील नितेश देवकर मित्र मंडळाच्या सदस्यांनी बाईत यांच्या निवासस्थानी जाऊन शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी नितेश देवकर मित्र मंडळाचे नितेश देवकर यांच्या सोबतच संतोष तवसाळकर, तृशांत भाटकर, संदेश देवकर, राजेश जैन, वैभव आरेकर, आर्यन तवसाळकर, अभिनय केळसकर, प्रवीण सातनाक, सुयोग मयेकर आदी आंजर्ले येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. आंजर्ले ग्राम पंचायतीच्या अंतर्गत गाव वाड्यांमध्ये काही अपवादात्मक स्थितीत छोटे-मोठे वाद उद्भवलेच तर ते पंचायत पातळीवरच सोडवले जातील.

टाईम्स स्पेशल

कोर्ट किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापूर्वीच समेट घडवून आणले जावून गावामध्ये शांतता, बंधुभाव, आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गावातील वाद-विवाद आणि तंटे ग्रामस्थांच्या सहभागाने न्यायपूर्वक आणि शांततेने सोडवण्यासाठी निश्चितच तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून नव्याने निवड झालेले श्री. वैभव बाईत हे तंटामुक्ती अध्यक्ष या नात्याने आपली प्रतिष्ठा पणाला लावून आंजर्ले गावात पुर्वापार असलेले ऐक्य अबाधित ठेवतील अशा प्रकारचा विश्वास उपस्थित आंजर्ले येथील प्रतिष्ठित ग्रामस्थांसह नितेश देवकर मित्र मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg