loader
Breaking News
Breaking News
Foto

‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीतबाबत एमआयएम नेते वारीस पठाण यांचे वादग्रस्त विधान - “मला फाशीवर जरी चढवलं तरी वंदे मातरम् गाणार नाही"

मुंबई : वंदे मातरम् गीतावरून देशात राजकीय वातावरण तापले असतानाच AIMIMचे नेते वारिस पठाण यांनी या मुद्द्यावर वादग्रस्त विधान करत नवा वाद निर्माण केला आहे. “मला फाशीवर जरी चढवलं तरी मी वंदे मातरम् गाणार नाही,” असं पठाण यांनी म्हटलं आहे. मात्र, आम्ही वंदे मातरम् गीताचा सन्मान करतो; पण ते कोणावरही जबरदस्तीने लादता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.संविधान सर्वांसाठी समान असल्याचं सांगत त्यांनी समानतेच्या तत्त्वावर ही मागणी केली आहे. फडणवीस सरकार समोर हे आव्हान असून सरकार आता कोणता निर्णय घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मराठी भाषेच्या मुद्द्यावरूनही पठाण यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. मराठी सर्वांनी शिकली पाहिजे; मात्र भीती दाखवून, धमकावून किंवा नोटीस पाठवून मराठी शिकवणं योग्य नाही, असं ते म्हणाले. “हिम्मत असेल तर बॉलिवूडमधील कलाकार आणि मोठ्या उद्योगपतींसाठीही मराठी अनिवार्य करा,” असं आव्हान त्यांनी सरकारला दिलं. दरम्यान, ईद-ए-मिलादच्या दिवशी महाराष्ट्रात एक दिवस दारूबंदी लागू करण्याची मागणीही पठाण यांनी केली आहे. हिंदू सणांच्या दिवशी दारू आणि मांस-मटण विक्रीवर निर्बंध घातले जातात, त्याच धर्तीवर २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलादच्या दिवशी राज्यातील दारूची दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी त्यांनी केली.

टाइम्स स्पेशल

राहुल गांधी यांचं नाव न घेता पठाण यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला. GenZ आणि विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करू नये, असं ते म्हणाले. तरुणांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारला झुकावं लागलं असून आम्ही तरुणांसोबत आहोत; मात्र या मुद्द्यावर राजकारण करणं योग्य नाही, असं पठाण यांनी सांगितलं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg