loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा घाटातील एसटी वाहतूक सुरु, दरडग्रस्त भागात वाहतूक अत्यंत्य धिम्यागतीने चालवण्याच्या एसटी विभागाला सूचना

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड येथील रस्त्याला भेगा पडून रस्ता खचला होता. त्यामुळे घाटातील एसटी वाहतूक नऊ ऑगस्ट पासून तर मालवाहतूक अवजड वाहने त्याआधीच बंद करण्यात आली होती. वाहनधारक व प्रवाशी, नोकरदार यांचे यामुळे अक्षरशः हाल झाले होते. याची दखल आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्यासह रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल,प्रांताधिकारी जिवन देसाई संगमेश्वरच्या तहसीलदार अमृता साबळे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकारी, रत्नागिरी व कोल्हापूर पोलीस प्रशासन आंबा घाटातील प्रत्यक्ष खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. रत्नागिरी टाइम्स डिजीटलने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेवून प्रशासनाने तातडीची पावले उचचली, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आंबा घाटातील वाहतूक सावध व वेगावर मर्यादा ठेऊन सुरु करता येऊ शकते. आज पासून आंबा घाट मार्गे विभाग नियंत्रक जानराव यांचा आदेश रत्नागिरी वाहतूक विभागाला आल्याने एसटी वाहतूक सुरु करण्यात आली. यावेळी वाहतूक अधिकारी सचिन सुर्वे यांचे सहकार्य लाभले असून आंबाघाटात खचलेल्या ओझरे खिंडीतील मार्गांवर एस.टी. चालक - वाहक यांना वाहन अत्यंत्य सावकाश चाविण्याच्या सूचना देण्यासाठी रत्नागिरी विभागाची मार्ग तपासणी टीमचे सहाय्य्क वाहतूक निरीक्षक गणेश वायदंडे, टी.सी. सुनील माळी, चालक विश्वास कनवजे, यशवंत मयेकर आंबा घाटातील खचलेल्या ओझरे खिंडीत थांबून आहेत.

टाईम्स स्पेशल

रत्नागिरी विभागाच्या एसटी वाहतूक सुरु झाल्याने आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, वाहतूक विभागाचे सर्व अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी यांना प्रवाशी वर्गाने धन्यवाद दिले. आज देवरुख बस स्थानकातून सकाळी ७.१५ वाजता सुटणारी देवरुख - लातूर एसटी आंबा घाटातून सुखरूप व व्यवस्थित पास झाल्याचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक गणेश वायदंडे यांनी सांगितले. आमदार भैय्या सामंत यांनी गणेश उत्सवापूर्वी रत्नागिरी कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यां समवेत तसेच संबंधित सर्व कार्यालयातील अधिकार्‍यांच्या समावेत पाहणी करून वाहतुकीची अडचण दूर करण्यासाठी वाहतूक सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व स्तरातून आमदार भैय्या सामंत यांचे आभार मानले जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg