loader
Breaking News
Breaking News
Foto

नातूनगर रस्त्यावर तीन ठिकाणी दरड कोसळून दीड महिना; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

खेड (प्रतिनिधी) - मुंबई–गोवा महामार्गावरील नातूनगर गावातून जाणाऱ्या नातूनगर रस्त्यावर तीन ठिकाणी दरड कोसळून तब्बल दीड महिना उलटला आहे. मात्र अद्यापही रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवतर–जामगे–आंबये तसेच चिंचाळी मार्गे जोडणारा हा महत्त्वाचा पर्यायी मार्ग असल्याने या रस्त्यावर स्थानिकांची मोठी वाहतूक असते. दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून, स्थानिक ग्रामस्थ सचिन उर्फ बबलू सकपाळ यांनी प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याकडेही विनंती करण्यात आली असून, संबंधित ठेकेदार व प्रशासनाने तातडीने दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येत्या गणेशोत्सवापूर्वी हा मार्ग सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांचे जवळपास २० ते २५ किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी नातूनगर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg