loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल तालुक्यात वारकरी भवन निर्मिती व्हावी, आरपीआय पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे

पनवेल : वारकरी संप्रदाय हा विठ्ठलभक्तीवर आधारित संप्रदाय आहे. पंढरपूरची वारी करणे आणि विठ्ठल-रुक्मिणीची उपासना करणे हा या संप्रदायाचा मुख्य मूळ आधार आहे. संत ज्ञानेश्वरांनी या पंथाची पायाभरणी केली व संत तुकाराम महाराजांनी या चळवळीचा विस्तार केला. समता आणि बंधुता, सदाचार आणि नैतिकता, दररोज हरिपाठ म्हणणे, भजन, कीर्तन आणि संतांच्या गाथेचे वाचन करणे हा नित्य नियम आचार विचार घेऊन हा संप्रदाय महाराष्ट्र राज्याची परंपरा टिकवत नवीन पिढीला दिशा देण्याचे काम करीत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी एकत्र येतात, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांसह विविध संतांच्या पालख्या त्यांच्या समाधी स्थळावरून पंढरपुरकडे पदयात्रेने जातात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून असंख्य भाविक जात असताना विसाव्याचे हक्काचे ठिकाण यासाठी पनवेल महानगर पालिका क्षेत्रात किंवा ग्रामीण भागात वारकरी भवन निर्मिती व्हावी, अशी मागणी पनवेल शहर आरपीआय अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

याबाबत रायगड जिल्हाधीकारी यांना महाराष्ट्र शासनाचा भूखंड या संप्रदायाला द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच पनवेल महानगर पालिकेच्या मालकीच्या भूखंड पैकी भूखंड कायमस्वरूपी वारकरी भवन निर्मितीसाठी मिळावा अशी मागणी निलेश सोनावणे यांनी केली आहे. याबाबत लवकरच पनवेल विधान सभेचे आमदार प्रशांत ठाकूर, विधानपरिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्याकडे देखील या वारकरी भवनाच्या निर्मितीसाठी निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे सोनावणे यांनी सांगितले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg