loader
Breaking News
Breaking News
Foto

" गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक आम्ही जिंकलो असतो, पण आता एक चूक झाली, "....पृथ्वीराज चव्हाण यांची दुसरी पत्रकार परिषद

मुंबई : गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, असे विधान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर शिवसेना आणि भाजपा पक्षांच्या नेत्यांमधून यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. राजकीय वादंगाचा विषय बनविण्यात आला. त्यानंतर पुन्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना मोठा दावा केला होता. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला होता. परंतु तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र या पक्ष प्रवेशाला विरोध केला, त्यामुळे हा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती, परंतु आता त्यांनी मुंडेंच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडून चूक झाली असं म्हटलं आहे.सोनिया गांधी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशासाठी तयार होत्या, परंतु मनमोहन सिंग यांच्यामुळे हा पक्षप्रवेश होऊ शकला नाही, तेवढी ताकद त्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्याकडे होती का? असा प्रश्न यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना मुंडेंच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडून चूक झाली असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. ‘प्रश्न असा आहे की, संसदीय परंपरेप्रमाणे एखाद्या व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यायचा की नाही हे पक्षाध्यक्ष ठरवतात, आणि एखाद्या व्यक्तीला मंत्री करायचं असेल तर ते पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री ठरवतात, त्यामध्ये माझी चूक झाली, असं यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान संजय राऊत म्हणतात की जर आज गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये असते तर जिंवत असते? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की, यावर मी फार काही बोलणार नाही, मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ज्या नेत्याला फार मोठं भवितव्य होतं असा नेता अचानक आपल्याला सोडून गेला. त्यामुळे मी त्याबद्दल फार काही बोलणार नाही.’ ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक आम्ही जिंकलो असतो, मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे, असंही यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg