loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा घाटाची रत्नागिरी-कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचेकडून पाहणी, आमदार किरण सामंत यांचा गणेशोत्सवापूर्वी वाहतूक सुरु करण्याचा निर्धार

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड येथे रस्त्याला भेगा पडल्याने व संरक्षक भिंत कोसळल्याने अवजड वाहतूक व एस.टी.वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशी, व्यापारी वर्ग व मालवाहतूकदार यांना मोठया समस्याना तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक नुकसान अधिक, वेळ यामुळे वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत. आंबा घाट हा रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्याना जोडणारा व्यापारी दृष्ट्या महत्वाचा मार्ग आहे. याची दखल घेत आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह आंबाघाटाची प्रत्यक्ष पाहणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येणारा गणेशोउत्सव पाहता हा रस्ता सुरु होणे आवश्यक असल्याचे मत आमदारांनी व्यक्त केले. मात्र रात्रीच्या वेळेस अवजड वाहतूक बंद ठेऊन दिवसा सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चार सहा चाकी वाहतूक सुरु करण्यासंबंधी करून संधीत यंत्रणांशी विचार विनिमय करून निर्णय घेतला जाईल, असे आमदार भैया सामंत म्हणून वाहतुकीबाबत हिरवा कंदील दिला असल्याचे म्हटले. मात्र अंतिम निर्णय अजून झाला नसून रत्नागिरी व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग, वाहतूक विभाग, प्रशासन यंत्रणा काय निर्णय घेणार यावर आंबा घाट सुरु होण्यासाठी अवलंबून आहे. यावेळी आमदार किरण सामंत, रत्नागिरी - कोल्हापुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तहसीलदार, आर. टी. ओ., वाहतूकविभाग, पोलीस प्रशासन, पदाधिकारी, कार्यकर्ते बहूसंख्येने पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg