loader
Breaking News
Breaking News
Foto

पत्रादेवी हे राष्ट्रीय एकात्मतेचे तीर्थक्षेत्र - केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

बांदा (आशुतोष भांगले) - देश स्वतंत्र झाला होता पण तरीही गोवा पारतंत्र्यात होता अशा स्थितीत संपूर्ण भारताच्या विविध प्रांतातून आलेल्या स्वतंत्र सैनिकांनी गोव्यासाठी लढा दिला. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात ते सहभागी झाले आणि गोव्यासाठी बलिदानही दिले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या अंतिम अध्याय गोव्यात लिहिला गेला. त्यामुळे प्रांतांच्या सीमा ओलांडून राष्ट्रहीताला प्राधान्य देणारा गोव्याचा मुक्ती लढा हा राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम उदाहरण आहे आणि गोव्याच्या सीमेवर असलेले हे हुतात्मा स्मृती स्मारक पत्रादेवी हे राष्ट्रीय एकात्मतेचे तीर्थक्षेत्र आहे. असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रादेवी येथे केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गोवामुक्ती लढ्याचे शिल्पकार असलेल्या हुतात्म्यांच्या सदैव स्मरणार्थ सरकारने सुमारे 4.9 कोटी रुपये खर्च करून पुर्वीच्या स्मारकाचे विस्तारीकरण व सुशोभीकरण केले आहे. या स्मारकाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले.यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार प्रवीण आर्लेकर स्वातंत्र्यसैनिक संघटना अध्यक्ष उपस्थित होते. राजनाथसिंह पुढे म्हणाले की आज भारत एक सक्षम राष्ट्र म्हणून जगात ओळखले जाते. ऑपरेशन विजय, ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या प्रत्युत्तराची समर्थ उदाहरणे आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामातील स्मृतींना उजाळा दिला. हा इतिहास गोव्यातील पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यसेनानींच्या परिवाराला आपण प्रत्यक्ष भेटून त्यांचा सन्मान केल्याचे तसेच प्रत्येक स्वातंत्र्यसेनानींच्या मुलांना सरकारी नोकरी देण्यास कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या आरंभ मान्यवरांच्या हस्ते तुलसीजल अर्पण कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते राजना​याथ सिंह यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राजनाथ सिंह यांच्या हस्ते मार्टल्स ऑफ गोवा पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. सोहळ्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मत्स्यव्यवसाय मंत्री नीलकंठ हळर्णकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, आमदार प्रेमेंद्र विष्णू शेट, डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रवीण आर्लेकर, जीत आरोलकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव, गोवा, दमण आणि दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई, सिंधुदुर्गचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांत विरसिंग वसावे तसेच अनेक स्वातंत्र्यसैनिक व मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

हुतात्मा स्मृती स्मारकाचे थाटात लोकार्पण

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg