loader
Breaking News
Breaking News
Foto

रिंगणे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विकास आयरे यांची सलग पाच वेळा फेर निवड

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील रिंगणे ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विकास चंद्रकांत आयरे यांची सलग पाचव्यांदा बिनविरोध फेर निवड करण्यात आली आहे. त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. गावातील वाद गावातच मिटावेत या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त समिती प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत कार्यरत असते. या समितीच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांचे असलेले वाद गावात मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी या समितीचा अध्यक्ष नव्याने ग्रामसभेमध्ये निवडला जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रिंगणे ग्रामपंचायतीची तंटामुक्त समिती पदी सलग गेली चार वर्षे विकास आयरे कार्यरत होते. त्यानी आपल्या चार वर्षाच्या कार्यकाळात गावातील अनेक वाद मिटविण्यात मोठी भुमिका बजावली आहे. त्यांच्या या कामावर विश्वास ठेवुन रिंगणे गावातील ग्रामस्थानी एक मताने दि.२५ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सलग पाचव्यांदा विकास आयरे यांची तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg