loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचे पडघम! चार मतदारसंघ वाढल्याने २५ जागा; अध्यक्षपदासाठी सामंत-चोरगे फॉर्म्युल्याची चर्चा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असून, जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. चार नवीन मतदारसंघ वाढल्याने यंदा एकूण २५ मतदारसंघ झाले आहेत. विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे हे निवडणूक लढविणार असल्याचे समजते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे समीकरण महत्त्वाचे ठरणार असून, पालकमंत्री ना. उदय सामंत आणि डॉ. चोरगे हेच प्रमुख निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठीही महायुतीमध्ये एक फॉर्म्युला चर्चेत असल्याचे समजते. निवडणुकीनंतर पहिले एक वर्ष पालकमंत्री ना. उदय सामंत अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील आणि त्यानंतर उर्वरित चार वर्षे डॉ. तानाजीराव चोरगे अध्यक्ष राहतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. महायुतीमध्ये मतदारसंघनिहाय समन्वय साधला गेला, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पातळीवर हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, खेड तालुका शेती मतदारसंघात मात्र संभाव्य निवडणुकीची चुरस निर्माण झाली आहे. या मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सभापती अण्णा कदम इच्छुक आहेत. त्याच मतदारसंघातून विद्यमान उपाध्यक्ष बाबाजी जाधव हेही इच्छुक असल्याने, या मतदारसंघात निवडणूक होण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे. २५ मतदारसंघ, महायुतीचे समीकरण, अध्यक्षपदाचा फॉर्म्युला आणि खेडमधील संभाव्य लढत यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg