loader
Breaking News
Breaking News
Foto

भाट्ये बीचचा होणार कायापालट! १५ कोटींचा सुशोभीकरण आराखडा

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील निसर्गरम्य भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या विकासाला आता नवी दिशा मिळणार आहे. सुंदर समुद्रकिनारा आणि झरे-विनायक देवस्थानामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या परिसराचे मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्याचा निर्णय पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी घेतला आहे. या परिसराच्या विकासासाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला असून, यामध्ये पर्यटकांसाठी विविध अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. समुद्रकिनाऱ्यावर फुटपाथ, खाद्यपदार्थांचे स्टॉल, लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा यासह परिसर अधिक आकर्षक आणि पर्यटनपूरक करण्यासाठी विविध कामांचा समावेश असणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाट्ये समुद्रकिनाऱ्याला आधीपासूनच निसर्गाचे वरदान लाभले आहे. मात्र, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास या किनाऱ्याची पर्यटन क्षमता आणखी वाढू शकते. या विकासामुळे केवळ पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता नाही, तर स्थानिक व्यावसायिक आणि तरुणांना रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होऊ शकतात. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव पर्यटन विभागाकडे पाठविण्यात येणार असून, मंजुरीनंतर पुढील कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. रत्नागिरीच्या पर्यटनाला नवी ओळख देणाऱ्या भाट्ये बीचचा कायापालट प्रत्यक्षात कधी होणार, याकडे आता स्थानिकांसह पर्यटकांचे लक्ष लागले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg