loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवात जिल्हावासियांची गैरसोय टाळा; रिक्षा स्टँडवर दरपत्रक लावा व घाट मार्गात यंत्रणा सज्ज ठेवा

रत्नागिरी, : गणेशोत्सवासाठी कोकणात येणारे जिल्हावासीय व स्थानिक नागरिकांना वाढीव दर आकारणी, सीएनजी तुटवडा किंवा घाट रस्त्यांवरील वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करत चोख नियोजन करावे. विशेषतः प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) प्रत्येक रिक्षा स्टँडवर अधिकृत दरपत्रकाचे फलक लावावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीतील महत्त्वाचे निर्देश: महामार्ग व घाट रस्ते सुरक्षा: कशेडी ते खारेपाटण (मुंबई-गोवा महामार्ग) तसेच मिऱ्या-कोल्हापूर महामार्गावर महामार्ग पोलीस, NHAI, उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी. रस्त्यांवर योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक व रेडियम लावावेत. घाट मार्गावर दरड कोसळणे, झाड पडणे किंवा अपघाताच्या घटना टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी. एसटी व कोकण रेल्वे समन्वय: रेल्वे गाड्यांच्या वेळा लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने (ST) अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन करावे. रिक्षा भाडे नियंत्रण व मीटर तपासणी: आरटीओ विभागाने रिक्षा चालकांची तातडीने बैठक घेऊन मीटर तपासणी पूर्ण करावी आणि प्रवाशांच्या माहितीसाठी प्रत्येक स्टँडवर भाडे दरपत्रक प्रदर्शित करावे. अखंडित वीज व सीएनजी पुरवठा: महावितरणने उत्सवादरम्यान अखंडित वीजपुरवठा ठेवावा, तसेच जिल्ह्यात सीएनजी पंपांवर वाहनांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी. खाद्यपदार्थ तपासणी व विसर्जन व्यवस्था: अन्न व औषध प्रशासनाने बाजारातील मिठाई व प्रसादाचा दर्जा तपासावा. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींनी विसर्जन घाटांवर कृत्रिम जलकुंड व निर्माल्य कलशांची पुरेशी व्यवस्था करावी.

टाईम्स स्पेशल

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. "उत्सवाच्या काळात कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी आपले मोबाईल बंद ठेवू नयेत व सतत संपर्कात राहावे," अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg