loader
Breaking News
Breaking News
Foto

पाऊस लवकरच दक्षिणेकडे सरकणार? मुंबईसह कोंकणात कसे असेल हवामान

पुणे : पावसाला आता माघारी जाण्याचे दिवस सुरु झालेत , त्यामुळे आतापासूनच पाणी अडविण्याची प्रक्रिया सुरु करायला हवी , धरण क्षेत्रात जरी पूस झाला तरी पाण्याचा अटकाव व्हायला हवा . देशातील मान्सूनच्या प्रवासाबाबत हवामान अंदाज मॉडेलमधून महत्त्वाचे संकेत मिळत आहेत. सध्या संपूर्ण भारतीय उपखंडात ढगांचे मोठ्या प्रमाणात आवरण पसरले असून विविध भागांत सक्रिय हवामान प्रणालींचा प्रभाव दिसून येत आहे. या हवामानाचा प्रभाव महाराष्ट्रावर ही दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस न पडल्याने पिकाचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान काही दिवसांत पावसाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सप्टेंबरच्या मध्यापासून उत्तरेकडील भागातील पावसाचा जोर कमी होऊन मान्सूनचा हा टप्पा तुलनेने सौम्य होऊ शकतो, असा अंदाज हवामान मॉडेलमधून व्यक्त करण्यात आला आहे.कोंकणात तडतडा पाऊस सुरु झाला कि असे म्हटले जाते ,पाऊस माघारी चाललाय ..सध्या असे दिसून येत आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्यास राज्यातील विविध विभागांमध्ये पावसाचे वितरण बदलू शकते. काही भागांत पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता असताना, काही भागांत पावसाचा खंड जाणवू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान अंदाजानुसार शेतीचे नियोजन करण्याची गरज आहे. सध्या वातावरणात अनेक हवामान प्रणाली सक्रिय असल्यामुळे देशातील विविध भागांत ढगाळ वातावरण आणि पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, मान्सूनच्या पुढील टप्प्यात हवामानातील बदल अधिक स्पष्टपणे जाणवण्याची शक्यता आहे.यामुळे राज्यात पाऊसाची वाट पाहत आहे.वामान अंदाज मॉडेलनुसार, सप्टेंबरच्या मध्यापासून पावसाच्या वितरणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या असलेली पावसाची सक्रियता कमी होऊ शकते आणि पावसाचा प्रमुख पट्टा हळूहळू दक्षिणेकडील भागांकडे सरकू शकतो. यामुळे उत्तर भारतातील काही भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून, दक्षिण आणि मध्य भारतातील काही भागांत हवामानातील हालचाली अधिक सक्रिय राहू शकतात. मात्र, स्थानिक हवामान प्रणाली आणि कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या घटना घडू शकतात.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, दुसरीकडे अल निनोच्या प्रभावाबाबतही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातील बदलांचा परिणाम जागतिक हवामानावर होतो. अल निनोची स्थिती प्रभावी झाल्यास त्याचा भारतीय मान्सूनवरही परिणाम होण्याची शक्यता असते. अल निनोचा प्रभाव वाढल्यास मान्सूनची सक्रियता कमी होऊ शकते आणि काही भागांत पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या उर्वरित कालावधीत मान्सूनची स्थिती कशी राहते, याकडे हवामान विभागासह शेतकरी आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg