loader
Breaking News
Breaking News
Foto

कांदळवन संवर्धनाचा ध्यास घेणारे रामजी भाबल यांचे आकस्मिक निधन

देवगड (प्रतिनिधी) - तिर्लॉट आंबेरी गावचे सुपुत्र, समर्पित समाजसेवक आणि कांदळवन (मँग्रोव्ह) संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणारे पर्यावरण कार्यकर्ते रामचंद्र उर्फ रामजी शामराव भाबल यांचे १ सप्टेंबर २०२६ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने तिर्लॉट आंबेरीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समाजकारण, पर्यावरण संवर्धन आणि कांदळवन संरक्षणाच्या क्षेत्रात रामजी भाबल यांनी उल्लेखनीय योगदान दिले. सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पर्यावरणाबाबतची त्यांची तळमळ आणि कांदळवन संवर्धनासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांच्या अकस्मात निधनाने भाबल कुटुंबावर तसेच संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून समाजकार्यातील एक अभ्यासू, ध्येयवादी आणि समर्पित व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि भाबल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg