loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड आगारातून कोकणासह पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा; ४ सप्टेंबरपासून २६ सप्टेंबरपर्यंत विशेष नियोजन

देवगड (प्रतिनिधी) - गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची वाढती संख्या लक्षात घेता एस.टी. महामंडळाच्या देवगड आगाराकडून मुंबई मार्गावर दिनांक १५ सप्टेंबर ते दिनांक २७ सप्टेंबर २६ या कालावधीत जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, पुणे तसेच इतर भागांतून गणेशोत्सवासाठी देवगड तालुक्यात येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी ही विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवगड आगाराकडून प्राप्त माहितीनुसार, ४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्हयात व जिल्हाबाहेर जादा बसफेऱ्या चालविण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई मार्गावर देवगड-बोरीवली (तरळा मार्गे), सायंकाळी १५.३० १५.४५, १६.००, १६.१५, १६.३०,१६.४५, १७.०० देवगड-मुंबई (तरळा मार्गे), सायंकाळी १६.१५, १६.३० १६.४५.देवगड-कुर्ली नेहरू नगर, सायंकाळी १६.००,१६.३०.देवगड-ठाणे, सायंकाळी १६.१५ .देवगड-नालासोपारा १५.००. तसेच देवगड-पुणे वल्लभनगर सकाळी ८.१० सायंकाळी १७.००, १७.२०. अशा गाड्या या मार्गांवर सोडण्यात येणार आहेत.

टाईम्स स्पेशल

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि हक्काची प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एस.टी. प्रशासनाकडून जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, तसेच आवश्यक असल्यास आगाऊ आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन देवगड आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg