loader
Breaking News
Breaking News
Foto

गणपती बाप्पांच्या पाठोपाठ गौरीचेही मोठ्या उत्साहात आगमन

रत्नागिरी (प्रतिनिधी)- कोकणामध्ये गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गणपती बाप्पांच्या पाठोपाठ गौरीचेही मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. कोकणातील अनेक घरांमध्ये गौरी म्हणजे माहेरवाशीण म्हणून येणारी माता पार्वती, तर काही ठिकाणी तिला समृद्धी, सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे गौरीच्या आगमनाला कोकणी कुटुंबांमध्ये विशेष महत्त्व आहे. गौरीच्या स्वागतासाठी घरातील महिला पारंपरिक पद्धतीने सजून-धजून रानावनात, शेताच्या बांधावर किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरात जातात. निसर्गात सहज उपलब्ध होणारी विविध रानफुले, पाने, फुलोरा आणि औषधी वनस्पती श्रद्धेने गोळा केल्या जातात. या फुला-पानांनी गौरीची आरास केली जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही कोकणी परंपरांमध्ये नदी किंवा पाणवठ्यावर जाऊन खडे, फुलोरा आणि गौरीचे प्रतीक घेऊन ते विधीपूर्वक घरी आणले जाते. या संपूर्ण प्रक्रियेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. रानावनातून आणलेली ही फुलं आणि वनस्पती म्हणजे केवळ सजावटीचा भाग नाही, तर कोकणच्या निसर्गाशी जोडलेली श्रद्धा आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेली लोकपरंपरा आहे. गौरीच्या आगमनानंतर घरामध्ये पूजा, आरती, नैवेद्य आणि महिलांच्या पारंपरिक खेळांनी उत्साहाला आणखी रंग चढतो. त्यामुळे गणरायाच्या आगमनानंतर आलेली गौराई कोकणातील गणेशोत्सवाचा आनंद आणखी द्विगुणित करते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg