loader
Breaking News
Breaking News
Foto

इयत्ता 10 वीच्या परीक्षेची तारीख जाहीर, या दिवशी पहिला पेपर, तयारीला लागा!

पुणे : इयत्ता दहावीचे वर्ष हे खूपच महत्त्वाचे मानले जाते. या परीक्षेत चांगले गुण मिळाले की नंतर तुम्हाला इयत्ता अकरावीसाठी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे ठरवणे सोपे जाते. विशेष म्हणजे इयत्ता दहावीत जेवढे जास्त गुणे तेवढेच तुम्हाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त वाढते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये चांगला अभ्यास करावा असे पालक, शिक्षक सांगत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. आमची परीक्षा नेमकी कधी होणार, असे या विद्यार्थ्यांकडून विचारले जात होते. आता याच परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षेची तारीख सोबतच जाहीर केली आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 16 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी रोजीपासून सुरू होईल. ही परीक्षा नंतर 11 मार्चपर्यंत चालेल. या तारखा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg