loader
Breaking News
Breaking News
Foto

मनोज जरांगे यांचे ठरले , आता आरपारचे रणांगण ,19 सप्टेंबरपासून आझाद मैदानावर करणार आमरण उपोषण

जालना. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. शनिवारी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीत त्यांनी आंदोलनाचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून सकाळी 11 वाजता मराठ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होईल, असे जाहीर करत त्यांनी मराठा बांधवांना आतापासूनच आंदोलनाच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले.गणपती बसवल्यानंतर थेट मुंबईच्या दिशेने निघायचे, असे सांगत जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा टप्प्याटप्प्याने प्रवासही जाहीर केला आहे. या मोर्चामध्ये राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी होण्याची शक्यता असल्याने आगामी काही दिवसांत राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाची घोषणा अशा वेळी झाली आहे, जेव्हा राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असून आगामी दिवसांत गणेश विसर्जनासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक व्यवस्था, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास आझाद मैदान परिसरासह दक्षिण मुंबईतील वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांकडून या आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.19 सप्टेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु करणार असल्याने आता आरपार रणांगण होईल ,असे मराठा कार्यकर्त्यांनी येथे सांगितले .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg