loader
Breaking News
Breaking News
Foto

गणपती उत्सवात विजेचे विघ्न; सतत वीज खंडित होत असल्याने भाविकांची नाराजी

म्हसळा : गणेश चतुर्थीच्या उत्साहात म्हसळा तालुक्यात सर्वत्र गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले असले, तरी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर काही प्रमाणात विरजण पडत आहे. गणपती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी अनेक भागांत वीज ये-जा करत असल्याने नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशमूर्तींचे आगमन, प्रतिष्ठापना, आरती, दर्शन तसेच रात्रीच्या वेळी विविध गणेश मंडळांकडून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र, ऐन उत्सवाच्या काळात अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही गैरसोय होत आहे. काही ठिकाणी वीज गेल्यानंतर बराच वेळ पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः सायंकाळच्या आरतीच्या वेळी तसेच रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास गणेशभक्तांना अंधारात दर्शन घ्यावे लागत आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची यामुळे अधिक गैरसोय होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टाईम्स स्पेशल

गणेशोत्सव हा तालुक्यातील महत्त्वाचा धार्मिक व सामाजिक उत्सव असल्याने या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने विशेष यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करून उत्सवाच्या काळात अनावश्यक वीजखंडित होऊ नये, अशी अपेक्षा भाविक व्यक्त करीत आहेत. गणेशोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवून गणेशभक्तांचा उत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी महावितरणने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg