loader
Breaking News
Breaking News
Foto

कोलझर ग्रामपंचायत कार्यालयात चोरीचा खळबळजनक प्रकार, ग्रामस्थांना वाटण्यासाठी वनविभागाने दिलेल्या तब्बल १०० बॅटर्‍या गायब?

तिलारी (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोळझर ग्रामपंचायत कार्यालयात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून वन विभाग, दोडामार्ग यांच्याकडून ग्रामस्थांना वाटण्यासाठी देण्यात आलेल्या अंदाजे १०० बॅटर्‍या चोरीला गेल्याची धक्कादायक तक्रार समोर आली आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच सुजल सूर्यकांत गवस यांनी याबाबत ५ सप्टेंबर २०२६ रोजी दोडामार्ग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तक्रारीनुसार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ९.४० वाजता ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आले असता कार्यालयातील बॅटर्‍या चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. अज्ञात व्यक्तीने ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश करून वन विभागाने ग्रामस्थांना वाटण्यासाठी दिलेल्या अंदाजे १०० बॅटर्‍या लंपास केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

वन विभागाकडून ग्रामस्थांच्या वापरासाठी देण्यात आलेल्या बॅटर्‍या ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्या चोरीला गेल्याने चोरीमागे नेमके कोण? कार्यालयात प्रवेश कसा झाला? एवढ्या मोठ्या संख्येने बॅटर्‍या कुठे नेण्यात आल्या? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. सरपंच सुजल गवस यांनी पोलिसांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून चोरीला गेलेल्या बॅटर्‍यांचा शोध घ्यावा आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg