loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रावण संपताच मिरकरवाडा बंदरात मच्छीप्रेमींची मोठी गर्दी; ताज्या माशांच्या खरेदीसाठी उडाली झुंबड

रत्नागिरी (जमीर खलफे) - पवित्र श्रावण महिना संपताच रत्नागिरीतील मत्स्यप्रेमींची पावले आता पुन्हा एकदा ताज्या आणि चवदार माशांच्या खरेदीसाठी मच्छीमार्केटच्या दिशेने वळू लागली आहेत. श्रावण महिन्याभरात पाळण्यात आलेल्या मांसाहार वर्ज्यतेच्या नियमांनंतर, नागरिक मोठ्या उत्सुकतेने मासळी बाजारात दाखल होत आहेत. याचाच प्रत्यय बुधवारी रत्नागिरीतील प्रसिद्ध मिरकरवाडा बंदरावर पाहायला मिळाला, जिथे सकाळीच मासे खरेदी करण्यासाठी खवय्यांची तुफान झुंबड उडाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिरकरवाडा येथील मच्छी मार्केटमध्ये विविध प्रकारची ताजी मासळी उपलब्ध झाल्याने ग्राहकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. पापलेट, सुरमई, कोळंबी, बांगडा आणि हलवा यांसारख्या आवडत्या माशांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मार्केटमध्ये मोठी गर्दी केली होती. श्रावणानंतरच्या या पहिल्याच बाजारात आवक उत्तम असल्याने व्यापार्‍यांच्या चेहर्‍यावरही समाधान पाहायला मिळाले. खवय्यांच्या वाढत्या मागणीमुळे बंदरावरील संपूर्ण वातावरण गजबजले होते.

टाईम्स स्पेशल

मासे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी सकाळपासूनच मार्केटमध्ये गर्दी केल्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना चांगलाच उधाण आले होते. विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील चढाओढीने बंदराचा परिसर गजबजून गेला होता. आगामी काळातही माशांची आवक अशीच कायम राहिल्यास मासळी बाजारातील हीच गजबज आणि खवय्यांचा उत्साह असाच कायम राहील, असा विश्वास स्थानिक व्यापार्‍यांकडून व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg