loader
Breaking News
Breaking News
Foto

विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द, समाजवादी नेते कपिल पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र पालघरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर समाजवादी नेते कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, दादरच्या ओबीसी प्रभागातून निवडून आलेल्या विशाखा मोरेश्वर राऊळ (राऊत) यांचे कुणबी जात प्रमाणपत्र पालघरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केलं आहे. विशाखा राऊत मुंबईच्या माजी महापौर आहेत. माजी आमदार आहेत. ओबीसी चळवळीतील जनार्दन पाटील यांच्याबरोबरचा कार्यकर्ता आणि अभ्यासक म्हणून मी हे ठामपणे सांगतो की, त्या कुणबी आहेत. माझ्या गावच्या आहेत. वाढवण बंदराच्या टाचेखाली जी गावं जाणार आहेत, तिथलं त्यांचं मूळ आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पालघरमधले वाडवळ, भंडारी, कुणबी (चोखार), वंजारी वसई आणि मुंबईतही आहेत. ते मुंबईत आलेत म्हणून ते पालघरचे रहिवासी नव्हेत हा विपर्यास झाला. विशाखा राऊत यांचा पक्ष कोणता याच्याशी देणंघेणं नाही. एक काळ आताच्या दोन्ही पातींचा मूळ पक्ष मंडल विरोधीच होता. पण त्यांच्या राजकारणासाठी आमच्या कुणब्यांचा बळी का द्यायचा? निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोकणी किंवा तिलोरी कुणबी ही महाराष्ट्रातील अन्य भागातील कुणबी आणि कुणबी मराठा यांच्यापेक्षा पूर्णपणे स्वतंत्र जात आहे. रंग, बांधा, रूप यात फरक आहे. ब्रिटीशांनी तो नोंदवून ठेवला आहे. कोकणातील मराठा किंवा राव मराठा यांच्या तुलनेत कुणबी सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला आहे.

टाईम्स स्पेशल

रायगड, रत्नागिरीत तर तो जमिनीपासून बेदखल आहे. निमअस्पृश्य आहे. त्याच्याकडे ना जमीन आहे, ना शिक्षण आहे, ना कोणती आर्थिक साधनं आहेत. लाखो कुणब्यांचे स्थलांतर मुंबई आणि अन्यत्र झाले आहे. पालघरमधल्या कुणब्यांकडे जमीन किंवा जागा आहे. होल्डिंग लहान आहे. त्यांनाही आता बेदखल करण्याची सुरवात विशाखा राऊत प्रकरणाने होते आहे. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. निमअस्पृश्यतेचे चटके पूर्वी सोसलेला कोकण कुणबी समाज संकटात आहे. ओबीसींमधल्या अतिमागास गटांचं उच्छेदन आपण होऊ देणार का ? हा प्रश्न आहे. एकदा राजकीय उच्छेदन झालं की अस्तित्त्व संपायला किती वेळ लागेल ? म्हणूनच याबाबत योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी विधान परिषदेचे माजी आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg